शेतकय्रांच्या मागण्या मान्य करण्यासाठी शेतकय्रांचे जनआंदोलनच आवश्यक – किशोर तिवारी

शेतकय्रांच्या मागण्या मान्य करण्यासाठी शेतकय्रांचे जनआंदोलनच आवश्यक – किशोर तिवारी
२५ जानेवारीच्या धरणे आंदोलनात शामिल होण्याचे शेतकय्रांना आव्हान
आशिष ब़डवे – १९ जानेवारी २००८
नागपुर – शेतकय्रांच्या मागण्या या शेतकय्रांच्या नसुन पश्चिम विदर्भातील ग्रामिण जीवनाचे अस्तित्व जिवंत ठेवण्याचा लढा असुन येत्या २५ जानेवारीला यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होत असलेल्या गैरराजकीय सर्व पक्षीय धरणे आंदोलनात शेतकय्रांनी सामिल व्हावे आवाहन शेतकरी नेते व विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी कळंब येथील चिंतामणी सभागृहात आयोजीत केलेल्या सभेत केले. येत्या २५ जानेवारीला माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया व खा. दत्ता मेघे यांच्या विदर्भ प्रदेश विकास परिषदे तर्फे यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजीत करण्यात आले आहे विदर्भ जनआंदोलन समिती, शेतकरी संघर्ष समिती, निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष  समिती, जबरन ज्योत शेतकरी संघटना या सक्रीयपणे सहभाग घेत असुन या धरणे आंदोलनात जेष्ठ नेते  माजी मंत्री मोहन धारीया, खा. दत्ता मेघे शेतकरी नेते विजय जावंधिया, विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी जेष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडे, शेतकरी संघर्ष समितीचे मोहन मामिडवार, विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय घाडगे, पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीचे मुबारक तंवर शामिल होणार आहेत. यावेळेस विदर्भातील शेतकर्य्रांच्या सर्व प्रकारचे शेती कर्ज माफ करा, कापसाला प्रती हेक्टरी २ हजार रूपये अनदान  द्या, सर्व वहितदारांना जमिनीचे कायम स्वरूपी पट्टे द्या, निम्न पैनगंगा प्रकल्पाचे बेरोजगारामध्ये रूपांतर करा, प्रत्येक तालुक्याला कृषी उद्योग कडधान्य पिकासाठी ५ हजार रूपये प्रती हेक्टर अनुदान वन्य प्राण्यापासुन पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकय्रांना अनुदान द्या, प्रत्येक खेड्याच्या स्तरावर पिक विमा योजनेचा फायदा द्या, संपुर्ण शेतकय्रांना भारनियमनापासुन मुक्ती द्या. या शेतकय्रांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात दारू बंदी करण्यात यावी या मागणीसाठी सुध्दा हजारो शेतकरी सामिल होत असल्याची माहिती  शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष मोहन मामिडवार यांनी दिली. २५ जानेवारीच्या धरणे आंदोलनासाठी  शेतकरी नेते व विदर्भ जनआंदोलन समितीचे सचिव मोहन जाधव, सुरेश बोलेनवार, भिमराव नैताम, वि. प्र. वि. परिषदेचे विजयभाऊ घाडगे, झंझावती दौरे करीत आहेत. विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी , शेतकरी संघर्ष समितीचे मोहन मामिडवार, व  पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीचे मुबारक तंवर यांनी सावळी सदोबा परिसरात दि. १७ जानेवारीला दौरा केला. व आंदोलनासाठी हजारो शेतकय्रांनी शामिल व्हावे असे आवाहन केले. निम्न पैनगंगा प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकय्रांसोबत लाभ क्षेत्रातील लेविचा फटका बसणारे हजारो शेतकरी त्यांच्या पाठिशी असुन हा प्रकल्प समुद्रात बुडविल्याशिवाय राहणार नाही अशी घोषणा मोहन मामिडवार यांनी केली. २५ जानेवारीच्या धरणे आंदोलनात सर्वच राजकीय नेत्यांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत असुन सर्वांना रितसर निमंत्रण देण्यात येत असल्याची माहिती किशोर तिवारी ह विजयभाऊ घाडगे यांनी यावेळी दिली.

Leave a Reply